Saturday, June 27, 2020

नैराश्याचे द्वंद्व




सरसर सरसर सरून गेले
काळाचे क्षण विरून गेले
पुष्कळसे मन विसरून गेले
कित्येक हातून निसटून गेले
अशांतीचे सूर लावून गेले
तर काही अतृप्त ठेवून गेले

मैत्री नाती उरली आता
कुणी दुखविले जाता जाता
कुणी दुखावले कळता
काही नाती आली जोडता
एकांताचे कायम  शल्य आता
स्मृतीत झुरणे उरले आता


मनी अंतरी उर्मी जागत नाही
आशा आकांक्षा उरल्या नाही
गरज कशाची भासत नाही
कौतुकाचे आता अप्रूप नाही
यशाचे काहीच वाटत नाही
नैराश्याचे  द्वंद्व  सुटत नाही

-           अभिजीत कुंभार

No comments:

Post a Comment